Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात. एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत. कारण Pluribus आणि हमारे राम दोन्ही कलाविष्कारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खास छाप पडली आहे, हे निश्चित!!

मी काही समीक्षक अथवा स्तंभ लेखक नाही. मात्र जेव्हा आतून हलून जातो तेव्हा लेखणी उचलतो. Vince Gilligan च्या “प्लुरिबस” ने आणि राहुल भूचर च्या हमारे राम ने असंच काहीसं केलंय. Pluribus या इंग्रजी वेबमालिकेमध्ये पोस्टआपोकलेप्टिक म्हणजे प्रलय्योत्तर साचा आहे. तर हमारे राम मध्ये रामायणच रंगमंचावर जिवंत केलं गेलं आहे. आशयाबद्दल सांगायचे तर “प्लुरिबस” मध्ये जगावर संकट आले असून परग्रह सदृश शक्तीने सर्व जनतेचा मनाचा ताबा घेतला आहे आणि त्यातून निर्माण झाले आहे- एक सामूहिक मन.  वाचली आहे ती यातील नायिका. तिच्या मनावर काहीही फरक पडलेला नाही आणि ती अडकत जाते विचित्र प्रसंगात. दुसरीकडे हमारे राम” 
मध्ये आधी म्हटल्याप्रमाणे रामायण सादर केले गेले आहे. सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या “स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती” प्रमाणे या नाट्य सादरीकरणाची देखील सुरुवात लवकुशांच्या गीताने होते आणि आपण प्रेक्षक स्वतःला रामायणाच्या मधोमध पाहतो. त्यातच जर लवकुश थेट प्रेक्षकांच्या मधूनच- अगदी सभागृहाच्या मागील दरवाजातून - प्रवेश करत असतील तर तो प्रभाव अधिकच परिणामकारी वाटतो. मग सुरू होते रंगमंचावर दृश्यकाव्य मेजवानी!

मंचावर नाट्यसादरीकरणामध्ये अनेक सुखद धक्के दिग्दर्शक गौरव भारद्वाज देतात. रंगमंचाच्या बॅक ड्रॉप साठी तंत्रज्ञानाचा वापर करत एक स्क्रीनच सज्ज केले आहे. त्यावर प्रवेश प्रसंगांन्वये चित्रे बदलत जातात. जसे सुरुवातीलाच पडदा उठल्यावर राजाराम उच्चस्थ सोनेरी सिंहासनावर बसून लवकुशांचे गीत ऐकून मंत्रमुग्ध होत असताना स्क्रीन राजसभेचे चित्र दाखवते आणि आपण थेट पोहोचतो रामसभेत! नंतर सीतेचे वसुंधरामातेत विलीन होणे ही देखील उत्कृष्ठ पद्धतीने दाखवण्यात आहे आले. अशा योग्य तांत्रिक गोष्टी वापरून हे नाट्य छान सजले आहे. सादरीकरणाच्या बाबतीत “प्लुरिबस” अगदी साधे आहे. खरं तर हे साधेपणच त्याचे वेगळेपण ठरते. परग्रह आक्रमण, प्रलय अशा बोजड संकल्पनांना अतिशय टोन डाऊन करत मांडल्यामुळे “प्लुरिबस” प्रभाव ठरते.  

मानव जात संपत आली आहे आणि नायिका-Carol- एकट्यानेच मानव म्हणून वावरते आहे. अशा प्रसंगांना दाखवताना उगाचचा आकांड तांडव विन्स गिलीगन टाळतात. याचे कारण कदाचित हे असावे की सर्व विनाशी प्रलय कोणीच पाहिलेला नाही आणि एक दिग्दर्शक किंवा रचिता म्हणून सिरीज मधून जो इम्पॅक्ट त्यांना दाखवायचा आहे तो अशा सर्वसामान्य संकल्पनांना छेद देणारा असल्यानेच प्रभावी ठरतो. त्यामुळेच कदाचित या सिरीजच्या निर्मितीसाठी खूप जास्त कॅमेऱ्याची गरज पडली नसावी. कमी संसाधनात अधिक प्रभाव याच्या सर्व 9 एपिसोड मध्ये वाटतो.

नायिकेचे घर आणि तिचे Zosia नामक सामूहिक मला मनाशी संभाषण हेच याचे मुख्य सूत्र ठरते. यादरम्यान नायिकेने केलेल्या छोट्या मोठ्या sorties आकर्षक आणि उत्कंठावर्धक वाटतात. ज्यामध्ये Carol ला सामूहिक मनाचे नानाविध पैलू कळतात आणि ती अचूकपणे ते सर्व नोंद करत राहते.

"प्ल्युरिबस" या वेबमालिकेतील संवादशैली आधुनिक, वेगवान आणि डिजिटल युगातील वास्तव प्रतिबिंबित करणारी आहे. पात्रांमधील बोलणं थेट, तर्कशुद्ध आणि प्रसंगानुसार ताण‑तणाव निर्माण करणारं आहे. त्याच्या उलट, "हमारे राम" या नाटकातील संवाद अधिक सांस्कृतिक, भावनात्मक आणि परंपरागत कथनशैलीवर आधारित आहेत. या नाटकात शब्दांना आध्यात्मिक वजन आहे, तर "प्ल्युरिबस" मध्ये शब्द परिस्थितीचं विश्लेषण करतात. त्यामुळे दोन्ही कलाकृती संवादाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जगांची निर्मिती करतात—एक आधुनिक वास्तवाचं, तर दुसरी सांस्कृतिक मूल्यांचं. जसं “प्लुरिबस” मधले नायिका Carol  आणि सामूहिक मनाची प्रतिनिधी Zosia यामधील हे संभाषण:

Carol: You people make no goddamn sense, do you know that? "We wanna make you happy", you say. "Your life is your own", you say. And agency, I've got all this agency! But, I mean, I guess I have agency just until I don't?

Zosia: Carol, if you were walking by a lake and you saw somebody drowning, would you throw them a life preserver? Of course you would. You wouldn't think, you wouldn't wait, you wouldn't try to get consensus on it. You'd just throw it.

Carol: So now I'm drowning?

Zosia: You just don't know it.

या  उलट रावणाचे “हमारे  राम” मधील तत्त्वज्ञान:

“ध्येय अनेक नहीं एक होंना चाहिये  और उसे पाने के रास्ते एक नही अनेक होने चाहिये। ”



पात्र निवड व अभिनय हे दोन्ही कलाकृतींमध्ये त्यांचे बलस्थान ठरले आहे. “हमारे राम” बद्दल बोलायच तर तब्बल तीन दशकांनंतर (एन एस डी सुटल्यावर) आशुतोष राणा रंगमंचावर पुनरागमन करत आहे. रावणाच्या भूमिकेसाठी त्याची निवड म्हणजे दिग्दर्शक गौरव भारद्वाज ला सलामच! रावण केवळ एक असुरश्रेष्ठ नसून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे नाना डंगी पैलू- शिवभक्त, विद्वान, लंका नरेश- हे आशुतोष ने लीलया पेलले आहेत. रामेश्वरचा शिवलिंग स्थापनेचा प्रसंग म्हणजे मला रावणाच्या व्यक्तिमत्त्वातील द्वंद्वाचा परमोच्यबिंदू वाटला. पण आशुतोष राणा ने त्याचा बाऊ न होऊ देता इतक्या सहजपणे साकारला आहे की जर एखाद्या नाट्यप्रवेशासाठी ऑस्कर असते तर यानेच ते पटकावले असते. एकीकडे आपण परस्त्रीला-सीतेला-बळजबरीने बंदी बनवली आहे आणि दुसरीकडे एक शिवभक्ताचार्य म्हणून रामेश्वरला रामाचाच पुरोहित म्हणून आपल्याला काम करावे लागणार आहे या सामान्यांसाठी अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला असामान्य सामर्थ्य असणाऱ्या रावणाने कसे सामोरे गेले असणार याचा प्रत्यय या प्रवेशाद्वारा येतो.खरंतर रामायणातला हा प्रसंग मला ठाऊकच नव्हता. पण दिग्दर्शकाने अनेक रामायणी आख्यायिका चपखल पणे नाटकात पेरल्या आहेत. राहुल भूचर यांनी सादर केलेला राम देखील मनात घर करतो. रामाला साजेचा आवाज, लकब, उंची, सौन्दर्यपूर्ण शालीनता यांची देणगीच जणू त्याला लाभली आहे. अभिनयाबद्दल बोलताना दीप्ती कुमारने सादर केलेली शूर्पणका आठवली नाही तरच नवल! संपूर्ण रामायण इवलेसे योगदान असणारी शूर्पणका
इथे मात्र नाटकानंतर पात्रपरिचयाच्या वेळी टाळ्यांचा उत्साहद्वारा काही औरच सांगते. दीप्ती कुमारने केलेली शूर्पणखा तिच्या कपटी बाण्यासह नेमकी टिपली आहे.

या नाटकाचा संपूर्ण लवाजमा 148 लोकांचा आहे असं पात्र परिचयाच्या वेळी सांगण्यात येते. नक्कीच यापेक्षा कमी जनता पलूरी बस मालिकेच्या नऊ एपिसोड मध्ये दिसते. अभिनयाच्या मोर्चावर “प्लुरिबस” मागे नाही. Carol निभवणारी Rhea Seehorn एक दर्जेदार अभिनेत्री आहे. आपल्या भोवतीचे कोसळणारे विश्व तिने आपल्या नानाविध भावाविष्कारातून घट्ट पकडून ठेवले आहे. मालिकेच्या शेवटी ज्यावेळी तिला एका गुपिताचा उकल होतो तेव्हा कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर स्थिर असतो. आणि चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि जोडीला श्वासातील अंतर- केवळ याच्या जोरावर ती प्रेक्षकाला स्तंभित करते. म्हणूनच कदाचित नुकताच तिला 83rd Golden Globe Award मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (टीव्ही सिरीज) चा अवॉर्ड मिळाला आहे.

एकूणच दोन्ही कलाकृती उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. एक जगाच्या अंताची गोष्ट सांगते तर दुसरी जगाच्या आरंभाची, एक आधुनिक - दुसरी पौराणिक, एक ओटीटीवर- दुसरी लाईव्ह परफॉर्मन्स असे असले तरीही प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घ्यायला कमी पडत नाही. दोन टोकांना उभ्या असणाऱ्या या दोन्ही ज्योती मन उजळणाऱ्या ठरतात.

-अमित भोळे, नवी दिल्ली

__________________________________________

English Translation: 


Pluribus हमारे राम

 

Last week, I experienced two extraordinary works of art—one on Apple TV and the other on stage. And now both are fighting for space in my mind, because  Pluribus  and  Humare Ram  have each left a distinct mark in their respective realms.

 

I am neither a critic nor a columnist. But whenever something shakes me from within, I feel compelled to write. Vince Gilligan’s  Pluribus  and Rahul Bhuchar’s  Humare Ram  did exactly that.  Pluribus , an English web series, is set in a postapocalyptic world, while  Humare Ram  brings the Ramayana alive on stage. In terms of content,  Pluribus  depicts a world under threat, where an alien-like force has taken control of the minds of all people, creating a collective consciousness. The protagonist is the only one unaffected, and she finds herself caught in bizarre situations. On the other hand,  Humare Ram  presents the Ramayana on stage. Just like Sudhir Phadke’s  Geet Ramayan  begins with the song “Svaye Shriram Prabhu Aikati Kushalav Ramayan Gati,” this play too opens with the song of Luv and Kush, instantly transporting the audience into the heart of the Ramayana. And when Luv and Kush enter not from backstage but from the auditorium’s rear door, the impact becomes even more powerful. What follows is a visual poetic feast on stage.

 

Director Gaurav Bhardwaj delivers many pleasant surprises in the stage production. A screen is used as a technological backdrop, changing visuals according to the scenes. For instance, when the curtain rises and King Rama sits on a golden throne listening to Luv and Kush’s song in awe, the screen displays the royal court, making us feel as though we’ve stepped right into it. Later, Sita merging into Mother Earth is also portrayed beautifully. These thoughtful technical elements enhance the play. In contrast,  Pluribus  is extremely simple in its presentation. In fact, this simplicity becomes its strength. Heavy concepts like alien invasion and apocalypse are toned down so effectively that the series becomes even more impactful.

 

Humanity is on the verge of extinction, and the protagonist—Carol—is the only human left. While depicting such scenes, Vince Gilligan avoids unnecessary chaos or melodrama. Perhaps because no one has actually witnessed a real apocalypse, the impact he aims for comes from breaking away from conventional portrayals. This may also be why the series doesn’t rely on excessive camera work. Across all nine episodes, the theme of “greater impact with fewer resources” is evident.

 

The story revolves around Carol’s home and her conversations with Zosia, the representative of the collective mind. Carol’s small and large sorties during this time are gripping and suspenseful. Through them, she discovers various facets of the collective consciousness and records them meticulously.

 

The dialogue style in  Pluribus  is modern, fast-paced, and reflective of the digital age. The conversations are direct, logical, and tensionbuilding. In contrast,  Humare Ram  features dialogues rooted in culture, emotion, and traditional storytelling. The words carry spiritual weight, whereas in  Pluribus , words analyze situations. Thus, both works create entirely different worlds through their dialogues—one modern and realistic, the other cultural and valuedriven. For example, the conversation between Carol and Zosia in  Pluribus :

 

Carol:  You people make no goddamn sense, do you know that? “We wanna make you happy,” you say. “Your life is your own,” you say. And agency, I’ve got all this agency! But, I mean, I guess I have agency just until I don’t?   

Zosia:  Carol, if you were walking by a lake and you saw somebody drowning, would you throw them a life preserver? Of course you would. You wouldn’t think, you wouldn’t wait, you wouldn’t try to get consensus on it. You’d just throw it.   

Carol:  So now I’m drowning?   

Zosia:  You just don’t know it.

 

And in contrast, Ravana’s philosophy in  Humare Ram :

 

 “One must have not many goals, but only one. And the paths to achieve it may be many.”

 

Casting and performances are strengths of both works. Speaking of  Humare Ram , Ashutosh Rana returns to the stage after nearly three decades (since leaving NSD). Choosing him for the role of Ravana deserves a salute to director Gaurav Bhardwaj. Ravana is not just a demon king; he is a devotee of Shiva, a scholar, and the ruler of Lanka—Ashutosh portrays all these layers effortlessly. The scene depicting the installation of the Shiva Linga at Rameshwaram felt like the pinnacle of Ravana’s inner conflict. Yet Ashutosh Rana performs it with such ease that if there were an Oscar for a stage entry, he would have won it. On one hand, he has forcibly imprisoned Sita, another man’s wife; on the other, as a devout priest of Shiva, he must perform rituals for Rama himself. This uncomfortable situation for ordinary people becomes a moment of extraordinary strength for Ravana, and the audience experiences this through the scene. I wasn’t even aware of this episode from the Ramayana, but the director has woven many such lesserknown stories seamlessly into the play.

 

Rahul Bhuchar’s portrayal of Rama also leaves a lasting impression. His voice, demeanour, height, and graceful composure seem tailormade for the role. And speaking of performances, how can one forget Deepti Kumar’s Shurpanakha? Though Shurpanakha has a small role in the Ramayana, the thunderous applause she receives during the cast introduction says everything. Deepti Kumar captures Shurpanakha’s cunning nature perfectly.

 

The entire production involves 148 people, as announced during the cast introduction. In contrast, far fewer people appear across the nine episodes of  Pluribus . Yet  Pluribus  is no less impressive in terms of acting. Rhea Seehorn, who plays Carol, is a remarkable actress. She holds together the collapsing world around her through her nuanced expressions. In the final episode, when she uncovers a secret, the camera stays fixed on her face. The shifting expressions and the rhythm of her breath alone leave the audience stunned. Perhaps that’s why she recently won the Golden Globe Award for Best Actress (TV Series).

 

In conclusion, both works are of exceptional quality. One tells the story of the end of the world, the other of its beginning. One is modern, the other mythological. One is on OTT, the other a live performance. Yet both succeed in capturing the audience’s mind. These two flames, standing at opposite ends, illuminate the heart equally.

 

-          Amit Bhole, New Delhi

Y

     “Y” हा चित्रपट पाहून आठवडा झाला. आज कुठे सावरतोय आणि शब्द सुचत आहेत. सिनेमा पाहून भारावण्याचे प्रसंग बरेच झाले आहेत मात्र Y ने जे नि:शब्द केले तो अनुभव एकमेकाद्वितीय!

पुण्यातील माझ्या काही मित्रांनी हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी पाहिला. आणि मला recommend केला. अगदी उत्कृष्ट आहे, हॉलीवुड वगैरे ला टक्कर देण्यारा बनलाय वगैरे वगैरे. पण योग जुळुन आला नाही. दिग्दर्शक डॉक्टर अजित वाडीकर माझा मित्र असल्याने त्यानेही कित्तेकदा ‘ये Y दाखवतो’ असे म्हटले पण जमलच नाही. त्यामुळे उत्सुकता. आणि बघताना एक correction factor लावून पहावा असे ठरवले.

चित्रपट सुरू होताच विषयाला हात घालतो. स्त्रीभ्रूणहत्येचा विषय आधीच संवेदनशील,  सर्वव्यापी असूनही ठराविक सर्कलमध्ये चर्चिला जाणारा या विषयाला introduce करावे वगैरेची भानगड अजितने टाळली. पहिल्या दृश्यापासूनच् चित्रपट जोर धरतो. सामाजिक विषयावर कलाकृती बनवत असताना साधारणत: दिग्दर्शकाला प्रबोधनाचे फिट येतात मात्र Y मध्ये डॉक्टर अजितने यावर आधीच विजय मिळालेला दिसतो. प्रेक्षकांना शिकवण न देता ‘जे आहे ते असं आहे’ हे सांगण्याकडे अजितचा कल आहे. मग असं करतांना आपण प्रेक्षकांना मनोरंजना पासून दूर तर नेत नाही ना याची काळजी देखील तो घेतो. Hyperlink format चा वापर करत दृश्यांची सरमिसळ चांगली जमली आहे. काही दृश्यांमध्ये Babel आणि Memento ची आठवण होते. पात्रांचे संवाद देखील चपखल बनले आहेत. मग ते पेशंट कंपाउंडर मधील तरल संवाद असोत अथवा डॉक्टर पुरुषोत्तमच्या तोंडची दमदार वाक्ये असोत सर्व प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. संपूर्ण चित्रपटात कोठेही सिनेमाची प्रेक्षकांच्या मनावरची पकड निसटत नाही. चित्रपटाचे संकलन उत्कृष्ट जमले आहे. पार्श्वसंगीताचा वापर पडद्यावरचा विषय अधिक गहरा करणारा झाला आहे. तांत्रिक दृष्ट्या (देखील) हा सिनेमा उच्च दर्जाचा बनला आहे. कलाकारांविषयी सांगायचे झाले तर सर्वच मस्त जुळून आले आहे. मुक्ता बर्वे, सुहास शिरवळकर, ओमकार गोवर्धन, प्राजक्ता माळी, संदीप पाठक सर्वांचे दमदार परफॉर्मन्स आहेत. मुक्ता बर्वेने साकारलेली डॉक्टर आरती देशमुख ही खरोखरची सरकारी नोकरीच्या कचाट्यात सापडलेली डॉक्टर वाटते. पण नंदू माधव यांनी साकारलेला डॉक्टर पुरुषोत्तम अंगावर येतो. मोजकी वाक्य आणि त्यातून येणारा त्यांचा aura खलनायकी भूमिकेतले सर्वच मापदंड उंचावणारा झाला आहे. अजितला जेव्हा त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तो म्हणतो ‘पडद्यावर नसतानाही कथेत सतत भास होणारा प्रभाव होता तो सरांनी अगदी बरोबर दिला आहे’.

अजित च्यामूवी प्लांनिंग चे एक चित्र
अजित च्यामूवी प्लांनिंग चे एक चित्र


    चित्रपट सुरू झाल्यापासून मी बारकाईने पाहत होतो. या काल्पनिक कथेत वापरलेल्या गाड्यांची MH 74 ची नंबर प्लेट, एकाच दृश्यात हायपरलिंक फॉरमॅटमध्ये दाखवताना दोनच्या जागी चार वेळा दिलेली दरवाजावरची
थाप(*) अशा अनेक खाचाखोचांबद्दल जेव्हा अजित सोबत चारचा केली   तेव्हा त्याने विचारपूर्वक केलेल्या दिग्दर्शक दिग्दर्शनाची चमक कळली. (*याबद्दल अजुन लिहावे  वाटते आहे मात्र स्पॉयलर ठरू नये म्हणून टाळतो)

डॉक्टर अजितचा हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत एक cult film ठरावी हे निश्चित. अजित ने सिनेमाचा घेतलेला ध्यास Y च्या कणाकणात दिसतो. मग त्याने दिलेले Y हे नाव असो, कथानकाची उकल असो, सेट निवड वा अगदी पात्रांची नावे असो. सर्वच विचारपूर्वक असल्याने Y आपले everlasting impression पाडण्यात यशस्वी ठरतो. प्रत्येक चांगली कलाकृती उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न समोर आणते आणि Y तेच करते. डॉक्टर अजित  तुझ्या या कलाकृतीने अनेक भाषात आपले रूपांतरण करावे आणि समाजातील सर्वांनी या विषयावर जागृत करावी ही सदिच्छा देतो. 


"माऊली, समोर चला!"


आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो किंवा for that matter कोणत्याही श्रद्धा स्थानाला भेट देतो. मग ते चर्च असो, मसजीद, गिरिजाघर अगदी काहीही असो, भक्ताची काय अपेक्षा असते? 2-4 ठळक गोष्टी असतात. एक, आपल्याला आपल्या प्रार्थना शांतचित्ताने करता याव्यात. दोन, रोजच्या ज्याच्या त्याच्या जीवनातील कच-कच, मच-मच आणि कट-कट यांपासून क्षणभर विश्रांती मिळून आपला संपर्क त्या सर्वोच्च शक्ती सोबत होण्याकरिता पूरक वातावरण मिळावे. तीन, आपला भक्तिमार्ग आणि आपल्यासोबत आलेल्या इतर भक्तांचा मार्ग यात चढाओढ नसावी. ते होऊ नये आणि आजच्या करोनानूभावाच्या काळात एक नवीन गोष्टीचा समावेश म्हणजे श्रद्धा स्थानाची भेट कोविड अप्रोप्रिएट एन्व्हायरमेंट मध्ये व्हावी. काल मी सपत्नीक श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिराला भेट दिली आणि ठामपणे वरील सर्व गोष्टींच्यासमोर बरोबरची खूकरू शकतो.

महाराजांचे दर्शन करोना संक्रमणाचे कारण होऊ नये म्हणून ट्रस्टने दर्शनासाठी मोफत ऑनलाइन पासची व्यवस्था सक्ती केलेली आहे. तो मिळवायचा असेल तर आधार कार्ड, मोबाईल इत्यादी माहिती भरून वेळेचा स्लॉट नक्की करता येतो. यामुळे एकूण क्त संख्या, दर तासाला दिले जाणारे प्रवेश, महाप्रसादाचे नियोजन यांवर नियंत्रण ठेवता येते. तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी मदतच होते.  ऐनवेळेस e-पास ची प्रिंट घेऊ शकलो नव्हतो तेव्हा काही अडचण तर होणार नाही अशी भीती होती. मात्र प्रवेशद्वाराच्या सेवाधारकाच्या वागणुकीत काहीही बदल झाला नाही. त्याने आमचे क्रेडन्शियल्स फोनच्या स्क्रीनवर तपासले आणि आमचा प्रवेश सीमलेस झाला.


परदेशात एका संशोधनात असे उघड झाल्याचे आठवते की कोणत्याही ठिकाणाची पहिले पाच मिनिटे दोनशेहून अधिक मोमेंट्स ऑफ ट्रूथ साठी कारणीभूत ठरतात.  मंदिराचा परिसर यास अपवाद नव्हता. आत शिरल्या शिरल्या आपण एका शिस्तबद्ध वातावरणात प्रवेश करत आहोत याचा अनुभव आला. शिरताना निर्जंतुकीकरण पॉईंटवर सेवाधारी प्रत्येक भक्ताच्या हातांचे निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करत होता. त्या पॉईंटनंतर ६ फुटांचं अंतर असावं. अशी रांग पुढे जावी यासाठी अॅरोने  दिशादर्शन देखील केले होते. मोठ्या आवारातून पुढे सरकत असताना मला जाणवले आपण चप्पल काढलीच नाही. तसं मंदिर, गाभारा दृष्टीक्षेपात वगैरे नव्हता पण आपण मंदिरात आलोय, आवारात मंद आवाजात स्पीकरवर मंत्रोच्चार सुरू आहे आणि आपण रांगेत आहोत आणि त्याच वेळेस पायात चपला पण आहेत काहीतरी चुकतंय असं वाटत होतं आयताकृती रांगेत पटापट सरकणार्या इतर भक्तांच्या पायांकडे पाहिले तर कोणी चपला घातल्या कोणी नाही त्यामुळे अधिकच बुचकळ्यात पडलो मग हॉलच्या चेक पॉईंट च्या पल्याड असलेल्या लोखंडी रॅक कडे लक्ष गेले आणि कुमकले ही तेथे चपला स्टँड असावी चेक पॉईंट कडे वळणावर सेवादार याने परत हातांना निर्जंतुक केले त्यात कुणाला समाधान झाले नसेल तर ऑटोमॅटिक डिस्पेंसर पण लावले होते चेक पॉईंटवर दोन तीन खिडक्या होत्या प्रत्येक खिडकी एक स्वतंत्र केबिन होती पलीकडचा सेवाधारी तुम्हाला पास नंबर विचारून तुमच्या प्रवेशाची खात्री करून घेत होता यानंतर जमिनीवरचे अॅरोजने आम्हाला चपला स्टॅन्ड पर्यंत नेले तेथे चपला ठेवल्यावर सेवादार याने रकान्याचा नंबर लक्षात ठेवण्यास सांगितले पुढे मंदिराकडे जाताना हात पाय धुण्यासाठी एक जागा केली आहे. तेथे 7-8 नळांतून पाण्याची संतक बारीक धार पडत असते. तिथे जातांना सेवाधारी परत भेटतो या खेपेला आपल्या हातावर साबणाच्या पाण्याचा फवारा मारतो. आपण स्वच्छ झाल्यावर मग आपण महाराजांच्या दर्शनासाठी समोर होतो. “माऊली समोर चला” अशी विनंती दर दहा पंधरा मीटर उभा सेवाधारी करत असतोच. आणि हो, जमिनीवर उभे राहण्याची चौकट खूण आहेतच. भक्त संख्या मर्यादित असल्याने रांग मोठी नव्हती आणि आमची मूवमेन्ट देखील भराभर होती.  असे आम्ही महाराजांच्या समोर गाभाऱ्यात पोहोचलो. दुपारचा मंद सुवास, स्पोटलेस स्वच्छता, आजुबाजूला मोजके लोक यामुळे दर्शन अगदी स्वर्गीय ठरले. या दर्शनासाठी खडतर आम्ही खूप वेळ प्रवास करून आलेलो पण देवाचिये द्वारी उभा क्षणभरी नामदेवाच्या या उक्तीप्रमाणे मुक्ती चारी साधियेले’  ही स्थिती क्षणार्धात होते. “माऊली समोर चला” या ऊक्ति कानावर पडत असतातच.

गाभाऱ्यातून समोर आपण महाप्रसादाचा कडे जातो. जागोजागी दिशादर्शनासाठी पाट्या आणि सेवाधारी उभे असल्याने चुकायचा प्रश्नच नाही. महाप्रसाद हॉल १ कडे निघालो.  सेवाधाऱ्याने हातांवर साबणाचा वर्षाव केला आणि ‘बेसिन मध्ये हात झटका’ असेही सांगितले. बारीक पाण्याची धार तिथेही होती. मग हॉलमध्ये जमिनीच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत जात आम्ही ताटांजवळ पोहोचलो. पलीकडची सेवाधारी व्यक्ती मास्क आणि ग्लोज घालून होती. ताट हातात घेतले. चपलांना हात लावला होता नंतर थेट ताटालाच! मध्ये चार वेळा सॅनिटायझर आणि दोन वेळा हात धुतलेले!! मध्ये कशालाही स्पर्श करायची गरजच नव्हती!!!

 महाप्रसाद म्हणजे भोजन.  त्यामध्ये वरण,पिठले,फळ भाजी, भात, मसाला भात, पोळ्या आणि बुंदीचे लाडू. बसण्यासाठी ठराविक जागा. बेंच सारखं स्टील स्ट्रक्चर.  त्यावर तीन जणांना बसण्याची सोय. आजूबाजूच्या जागांवर फूल्या आणि केवळ मधल्याच जागेवर बसण्यासाठी सुचवलेले. अशा शिस्तबद्ध पद्धतीत आम्ही नवरा बायको जवळ जवळच्या दोन बेंचवर दूर-दूर बसलो. बेंचवर पाण्याचा पेला सांडू नये म्हणून त्यासाठी गोल छिद्र करत त्याला खालून सपोर्ट देत सोय केली होती. मधून मधून मास्क ग्लोधारी सेवाधारी काय हवं, काय नको यासाठी विचारपूस करत होती. महाप्रसाद ताटात ठेवू नये या सूचना जागोजागी लिहिलेल्या आहेत. महाप्रसाद अगदी घरच्यासारखा पोट भरून तृप्त झाले. संपताच आपापले ताट ठराविक ठिकाणी ठेवून आम्ही पाय-चलित नळाच्या बेसिन जवळ पोहोचलो. रस्त्यात सेवाधाऱ्याने साबण दिलाच होता. हात धूऊन आम्ही रांगेत बाहेरच्या दिशेने निघालो. रवी महाराजांच्या पादुकांजवळ ध्यानासाठी भक्त बसायचे, कोरोना काळानंतर ते कक्ष बंद केले गेले.  आता ‘निर्गमन’ पथावर चौकटीत खुर्च्या ठेवून व्यवस्था आहे. तिथे तीन-चार देणगी खिडक्या होत्या त्या प्रत्येक कक्षातला सेवाधारी माइक स्पीकर च्या साह्याने संभाषण करत होता. मी देणगी दिल्यावर त्याने पत्ता विचारला. मी दिल्ली सांगितले आणि पावतीची वाट पाहत होतो. पण त्याने विचारले महाराष्ट्राचा पत्ता नाही का? कंप्यूटर दिल्ली घेत नाहीये. मी चमकलो आणि मग महाराष्ट्रातला पत्ता दिला.

 समोर चपला स्टँड जवळून चपला घेतल्यावर हात धुण्यासाठी बारीक धार होती. जवळच वाड्मय विभागाचा फलक पाहिला. तेथून सौ.नी विजय ग्रंथ आणि प्रार्थना स्तोत्र घेतली. विशेष म्हणजे त्याची किंमत स्वेच्छेने द्यावयाचे होती.

 आम्ही मग संतुष्ट  मनाने बाहेरच्या मार्गाकडे वळलो. सेवाधारी, पायांजवळची चौकट आणि पाट्या सोबतीला होत्या. मग जाणवले अरे, सेल्फी तर राहिलाच मग खिशातून फोन काढून फोटो काढला. “माऊली पुढे चला फोटो काढू नका” सेवाधारी बोलला. आजच्या सामाजिक मनाला सेल्फी पॉइंट मंदिरातही हवा असतो, नाही का? आनंदी अनुभव आणि शिस्तबद्ध सुटसुटीत कारभार यामुळे हे दर्शन विशेष ठरले. आधी मी दोन वर्षांपूर्वी दर्शनासाठी आलो होतो. तेव्हा शिस्त होती,सेवाधारी यांचे समर्पण होते, मात्र यावेळी ते अधिकच जाणवले. सेवाधाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम! कदाचित त्यामुळेच का काय माझा असा विश्वास आहे की इथे येणाऱ्या भक्तांपैकी 90 टक्के तरी रिपीटर असावे.

मी देव देव करणारा आहे अशी माझी ओळख नाही. पण मला ओळखणाऱ्यांना  माहित आहे की मी believer आहे म्हणजे मानवाच्या आकलना पलीकडच्या शक्तीमध्ये विश्वास असणाऱ्यांपैकी एक ! त्या शक्तीशी एकरूप होताना जी चित्त शांतता हवी ती श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात मिळाली. 

अमित भोळे 


(सदर लेख दैनिक हिंदुस्तान च्या अमरावती आवृत्तीत दि. १६ नोव्हेंबर , २०२१ रोजी प्रकाशित झाला.) 



 


दिल्लीतील दिवाळी (महाराष्ट्र टाइम्स 7 नोव्हेंबर, 2020, मुंबई )

दिल्लीतील दिवाळी

दिवाळी हा वर्षातला महत्त्वाचा सण. काही वर्षांपूर्वी दिवाळी च्या आसपासच नोकरीनिमित्त दिल्लीला स्थायिक झालो. हवा, पाण्याबरोबरच शहरातील रीतीरिवाजही सांस्कृतिक धक्का (culture shock) देणारे होते. माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला दिल्लीतील प्रत्येक गोष्ट अजब भासायला लागली होती.

 

दिवाळी म्हटले म्हणजे नोकरदार माणसाला सुट्ट्यांचा विशेष अप्रूप असतं.  मग ती ऑफिसला सुट्टी असो अथवा मुलांच्या शाळेला.  आम्हाला असायची अशी काही इकडे उत्तरेला दिवाळी ची म्हणून सुट्टी नसते.  मला आठवते आमच्या कडे सहामाही संपून लगेच दिवाळी ची सुट्टी लागे.  ती पण चांगले पंधरा-वीस दिवस.  इकडे मात्र दिवाळी ला फार फार तर दोन-चार  दिवस सुट्टी असते. कारण थंडीचा मुहूर्त साधून नाताळची तशी लांबलचक सुट्टी मिळते.  त्यात गेल्या दोनेक वर्षांपासून प्रदूषण सुट्टीची देखील भर पडली आहे.

 

आपल्याकडे दिवाळी चे स्टार अट्रॅक्शन (Star Attraction ) असते ते म्हणजे फराळ! चिवडा, चकल्या, लाडू यांची खमंग चव दिवाळी चे चार दिवसच नाही तर चांगले पंधरा एक दिवस जिभेवर असते. अनेक घरी तर दिवाळी झाल्यावर सकाळचा नाश्ता म्हणून दिवाळी चा फराळसंपवला जातो. दिल्लीमध्ये ही संकल्पना नसल्यातच जमा आहे. इकडे भर असतो तो रेडिमेट मिठाईचा.  आणि (कदाचित त्यामुळेच) तो जास्त रोचक, लोभस वाटत नाही. अलीकडच्या टीव्हीवरच्या जाहिरातीपहा. मराठी चॅनल्सवर दिवाळी च्या चिवड्याची जाहिरात दिसेल पण हिंदी चॅनलवर अशी एकही जाहिरात नाही. असलीच तर दिवाळी साठी तयार मिठाची जाहिरात दिसेल.

 

दुसरा महत्वाचा फरक म्हणजे आपल्याकडे आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दिवाळी निमित्त फराळाला बोलवतो. दिल्लीला दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्याकडे कल दिसतो. यांत तयार मिठाई सोबतच येऊ घातलेल्या थंडीला अनुकुल सुकामेवा भेट देण्यातच शुभेच्छुक धन्यता मानतात.  बाजारात जर चक्कर मारली तर दुकाने यानेच भरभरून असतात. इतके की अगदी स्टेशनरी विकणारा दुकानदारही दिवाळी त सुक्‍या मेव्याचे पाकिटे विकताना दिसतो. ही पाकिटे देखील विविध प्रकारची आकर्षक रीत्या बनवलेली असतात.  यासोबतच फळे, कोल्ड ड्रिंक्स, चीप्स यांचे विविध प्रकार घेऊन यांना एकत्र करून लाकडी खोक्यात गिफ्ट स्वरूपात विकले जातात.

 


दिवाळीतील दिल्लीचा बाजारही एकदम निराळा असतो.  रोषणाईच्या नानाविध चायनीज ते लोकल चित्रविचित्र दिव्यां सोबतच ते विकणार्‍यांची ही तोबा गर्दी असते. रवी बाजारात रस्त्यात आपल्याला थांबवून मोजे विकणारा बाळू या दिवसात गळ्याभोवती रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा विकताना दिसतो. आपल्याकडच्या बाजारपेठे सोबत इकडच्या बाजारपेठेची एकरूपता शोधायची झाली तर ती दिसते नवीन कपड्यांमध्ये. दुकानांत दिवाळी निमित्त नवीन माला सोबतच नवनवीन सेल पण लागलेले असतात.

 

दुसरी समानता म्हणजे दिवाळी च्या सणाची सुरुवात. जी धनतेरस पासून होत भाई दूज पर्यंत चालते. कडे धनतेरस ला ‘छोटी दिवाली’ असे देखील म्हणतात. आपल्याकडे छोटी-मोठी दिवाळी हा कन्सेप्ट नाही. तसेही इकडे नरक चतुर्दशी विशेष मनवत नाहीत. मी एकदा नरकचतुर्दशीला माझ्या दिल्लीतल्या शेजारच्या मित्राला विचारले कि तू किती वाजता उठलास? त्याने नऊ सांगितल्यावर मी गमतीत म्हणालो “अरे हम दोनो नरक मे भी पडोसी रहेंगे” त्याचा कन्फ्युज्ड चेहरा पाहून माझा हा विनोद सपशेल आपटला ही कळले.

 

लक्ष्मीपूजनाला पत्ते खेळायची प्रथा पण उत्तरेकडची! आपल्याकडे हिंदी सिनेमा व सिरियल मुळे तिला ही उचल मिळाली आहे म्हणे!! आपल्याकडे पावा म्हणजे बलिप्रतिपदा हा सण सौभाग्यवतीसाठी महत्त्वाचा मानला जातो.  सांस्कृतिक महत्वासोबतच प्रमुख आकर्षण असते ते नवऱ्याकडून मिळणारे गिफ्ट. या प्रथेबद्दल एकदा आमच्या सौ ने एका हिंदी भाषिक मित्राच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर ही गोड प्रथा त्या घरातही आनंदाने मानली जाऊ लागली. भाऊबीज ही उत्तरेत तितक्याच उत्साहात नवली जाते आणि दिवाळी ची सांगता होते. मला आठवते लहानपणी आम्ही दिवाळी तील काही फटाके तुळशी विवाहासाठी राखून ठेवत. पण इकडे ती संकल्पना नाही.

 

फटाक्यांचं विषय घेतला तर दिल्लीत गल्ली गल्ली सोबतच सारे जमून राजपथ,इंडिया गेट, कॉनॉट प्लेस इथे फटाके फोडत. अगदी मुंबईत मरीन ड्राइव्हवर करतात तसे. मात्र गेल्या दोनेक वर्षांपासून प्रदूषणावर बंदी म्हणून हे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला आकाशातली आतिषबाजीला मुकावे लागले आहे. यंदा तर दिवाळी अधिकच निराळी होणार आहे. मुळातच कोरोनाने बंधने घातली आहेत. त्यात कोणाकडे येणे-जाणे पण होणार नाही. त्यामुळे दिवाळी नेहमीसारखे नसेल- अगदी महाराष्ट्रात आणि दिल्लीत देखील. तरीही हा सण सर्वांसाठी इतका आनंदाचा असतो की यंदाचे अपवादात्मक वर्ष विसरून पुढच्या वर्षीचे कॅलेंडर आले की आपण दरवर्षी प्रमाणे दिवाळी कधी येणार हे सर्वप्रथम पाहू आणि आपले प्लॅन्स बनवू ही नक्की !

(सदर लेख महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत 7 नोव्हेंबर 2020 ला प्रकाशित झाला )

 


Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...