संम्मेलनास गेलेल्या नवोदित साहित्यिकास


साहित्य संम्मेलनास गेलेल्या नवोदित साहित्यिकास खुले पत्र:

मित्रा, सर्व प्रथम तुझे अभिनंदन. अनेक उदयोन्मुख लेखक ज्याचा केवळ विचारच करत राहतात ते तु प्रत्यक्षात केलस. ही काही साधी गोष्ट नाही मित्रा. अनेक संकटांना तोंड द्यावं लागत. एक तर साहित्य संम्मेलन जिथे कुठे असेल तिथे पोहचायला म्हणजे एक कठीण काम. एक तर स्वतंत्र गाडी परवडणारी नसते दुसरे महामंडळाच्या प्रवासाबद्दल न बोललेलेच बरे. ऐकलय की संम्मेलनास्थळी राहण्याची पण धड व्यवस्था नसते. असो. साहित्यिक प्रेरणा जेथुन घ्यायच्या असतात तिथे या सर्व गोष्टी खुज्या वाटतात. पत्र यासाठी लिहिण्याचे कारण असे की, तू ज्यासाठी तिथे गेलायेस ते तु नक्की मिळव. साहित्याचा हा उत्सव वर्षातून एकदाच येतो दोस्ता. यामुळे याचा पूरेपूर फायदा उचल. परिसंवादास हजर रहा. आवडत्या लेखकाच्या, कवीच्या भाषणातील एकेक शब्द अधाशासारखा वेच आणि त्यातुनच तुझ्या सर्जनशीलतेला नवी पालवी फुटू दे. हे सोपं नाही हं मित्रा, या एकाच वेळेस तुला इतर गोष्टी भूरळ पाडतील अशी पूरी तरतूद तिथे असणारच. जसे, पर्यटनासाठी नजीकची स्थळे, प्रादेशिक खाद्य, या सर्वाला बळी पडलेला संम्मेलनस्थळी आलेला लहान थोरांचा लोंढा आणि अजुन बरेच काही...पण आन्तर्मनातुन प्रेरित झालेल्या तुला मी काय बोध देणार?

अजुन एक मह्त्वाची गोष्ट, साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षीय भाषणाला आवर्जून हजर रहा. अरे, मी तर ह्या अनेक भाषणांच संकलित एक पुस्तक देखील विकत घेतलय ते (कधी कधी) वाचताना मी विचार करतो की, मी प्रत्यक्ष ह्या भाषणाच्या वेळी हजर असायला हवं होतं. हा मौका तुला लाभलाय त्याचं सोनं कर मित्रा. त्या भाषणामुले तुझा एक साहित्यिक द्रुष्टिकोण तयार होण्यास मदतच मिळेल. पण एक सुचना, ह्या भाषणाला समकालीन राजनैतिक रंग तर नाही न ते तपासुन घे आणि राजहंसाप्रमाणे हवं तेच निवड. या वरुन आठवल, प्रत्येक साहित्य संम्मेलनास राजकारण्याची मोठी हजेरी असते म्हणे, अरे दोन वर्षापूर्वी तर वाचल होत की उद्घाटना प्रसंगी सर्व नेतेच व्यासपीठावर होते आणि त्यामुळे कित्येक नामवंत साहित्यिक दुखावले गेले होते. पण तु तुझे द्येय ध्यानात ठेव. प्रत्येक साहित्यिकाची प्रेरणा निरनिराळ्या स्थानात असते. तु तुझे स्थान शोध. वरिष्ठ साहित्यिकांशी या वर चर्चा करता आलिसच तर सोन्याहुन पिवळं. ते (निदान सम्मेलानाच्या दिवसांत तरी) वेळ देतील ही अपेक्षा.

अजुन एक, तिथे पुस्तकांचं एक दालन असेल तिथे विक्रीस अनेक कलाक्रुती असतील. त्यातुन दुर्मिळच तेवढ्या वेच. बहुतेक वेळी ह्या दालनात बाजारीकरणाच्या नवनवीन क्लुप्त्या तुला पाहवयास मिळतील. सवलत दर, सभासद वर्गणी आणि बरेच काही.
अरे तुला कळणार पण नाही संम्मेलनाचे दिवस कसे भुर्र कन उडून जातिल. सोबत राहत्तील त्या केवळ आठवणी आणि मनात सहित्यिक ऊर्जेची ठिणगी. ह्या ठीणगी ला विझू देवू नकोस. त्यावर आपल्या लिखाणातून साहित्याच पेट्रोल शिंपडत रहा. पुढल्या वर्षाची वाट नको पाहूस. तोवर तुझे ही द्रुष्टिकोण तयार होतील तु पन कोण्या एका प्रवाहात मिसळून जाशील. कोण जाणो, तू येत्या वर्षात व्यासपीठाच्या अधिक नजदिक जाशील आणि नवनवोन्मेषशाली लेखकास तुही प्रेरणा देशिल.....

-तुझा एक अनोळखी दोस्त.

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...