I am no claustrophobic

claustrophobic हा किती tongue twisting शब्द आहे. अगदी लक्षात न ठेवण्याजोगा. पण तरीही जेव्हा मी लिफ्ट मध्ये शिरतो त्यावेळी या शब्दाची आठवण होते. मी काही बंद जागांना घाबरणाऱ्यातला नाही. (निदान मला जाणणाऱ्याकरीतातारी) मात्र 'लिफ्ट-एक अद्वितीय अनुभव' याला मी माझा PhD विषय नक्कीच बनवू शकतो.

मला अजूनही आठवते माझ्या बाबांसोबत मी लहान असताना हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा ते मला एका चिंचोळ्या खोलीत घेवून गेले. तेथे आधीच २-४ वार्डबॉय समक्ष लोक उभे होते. मावेल असा एक स्ट्रेचरदेखील होता. माझे बाबा त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते तेव्हा मी त्याना विचारले " हे ऑपरेशन थिअटर आहे का?" त्यांनी नाही सांगितले आणि शिस्तीत त्यासर्वांसोबत मलाही उभे ठाकले. समोरचा जाळीचा दरवाजा बंद झाला आणि गुरुत्वाकर्षणाला डावलत पोटातल्या वारांभाताला धक्का देत आम्ही उचललो गेलो. काही कळण्याआधीच ती सबंध खोली हलायची थांबली आणि जाळी उघडताच आम्ही बाहेर पडलो. मी परत बाबांना विचारले "थिअटर होते का ते?" तर बाबा म्हणाले, "लिफ्ट होती." नंतर मी अनेकदा लिफ्टमध्ये चढलो असेन मात्र काही उल्लेखनीय निरीक्षणांची नोंद न करणे माझ्यातल्या नवख्या Bloggerला शक्य नाही. 

मुंबईतल्या विक्टोरियन बिल्डींगमधल्या लोकलच्या आवाजाला सलाम ठोकणाऱ्या मोडकळलेल्या उघड्या लिफ्ट पासून दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच युरेका टोवेर्सच्या ८८ मजले निव्वळ ३८ सेकंदात सुसाट वेगाने पार करणाऱ्या अत्याधुनिक लिफ्टपर्यंत अनुभवलेला प्रत्येक लिफ्टप्रवास स्वत: एक अनोखा आहे.

लिफ्ट ही एक सुविधा असते. जिन्याचा त्रास वाचवण्यासाठीचा पर्याय असते. आमच्या होस्टेल मधली लिफ्ट मात्र ठराविक वेळेतच चालायची. का तर म्हणे शिस्त. कसली डोम्बाल्याची शिस्त? त्यात अजून भर तर काय, की पहिले दोन माळे लिफ्ट थांबणार नाही. हे म्हणजे अतीच ! नेमकी माझी रूम दुसऱ्या माळ्यावर, कित्येकदा तर मी तिसऱ्या माळ्यावर जायचो लिफ्टसाठी. असो, असे असले तरी काही म्हणणे नाही, पण जर दुसऱ्या मजल्यावरच्या उपऱ्यांना लिफ्टची सुविधा नाही तर मग त्रास पण नको नं? प्रत्येक वेळेस लिफ्टचा दरवाजा उघडला की ती irritating tune सबंध होस्टेलला ऐकू जायची. तेव्हा पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्यांना अधिक त्रास होई.

ह्या लिफ्टच्या ट्यूनची पण गंमतच असते.  एकदा जेव्हा मी नवीन नोकरीच्या ठिकाणी नरीमन पॉइन्टच्या बहुमजली इमारतीत गेलो तेव्हा तो लिफ्टमन आणि मी आम्ही दोघेच लिफ्टमध्ये होतो. लिफ्ट सुरु होताच सुंदर संगीत कानी पडले. मला वाटले ह्या लिफ्टमन कडे मोबाईलपण आहे? त्याकाळी मोबाईल आजइतका सर्रास वापरला जात नसे. मीच स्वत:ला म्हटले होते की पहिल्या पगारात पाहू आणि ह्याच्या जवळ मोबाईल...मग नरीमन पॉइन्ट, आलिशान, Financial Capital of India असे विचार मनात येत होते तितक्यात लिफ्ट थांबली आणि ट्यूनपण थांबली. मला कळले की ती लिफ्ट होती मोबाईल नाही. निदान याची जाणीव झाली की होस्टेलच्या कर्कश भसाड्या आवाजापेक्षा इथली बंदिस्त खोली जास्त संगीतमय आहे.

MBA करताना एक गोष्ट ऐकली होती. म्हणे कुण्या एका businessman ने त्याच्या ऑफिसमध्येएक लिफ्ट लावण्यासाठी Japanese इंजीनीअरला बोलावून सांगितले की मला सर्वात वेगवान लिफ्ट बनवून दे. Japanese तंत्रज्ञानाचा पाऊस पाडत त्याने मग तसे केले देखील पण ह्या पठ्ठ्याचं समाधान काही होईना. अखेर त्या Japanese ने त्या लिफ्ट मध्ये म्हणे आरसा लावला आणि businessman ला लिफ्ट विगावान वाटू लागली. आजही आरशात पाहत असलो तर कळतपण नाही मजला केव्हा आला ते.

लिफ्टमधल्या अशाच अचाट उपकरणांपैकी एक जोडी म्हणजे लाईट नी पंखा. मला अलीकडच्या Automatic लिफ्ट मधल्या या उपकरणांचे नवलच वाटते. म्हणजे यांना कसं कळतं आत लोक आहेत आता आपण सुरु व्हावं? मी तर उगाच दोनेकदा तळमजल्यावरून Top Floorचं बटन दाबलं आणि चटकन बाहेर पडलो. म्हटलं पाहावं काय होतं? काय झालं ते आजपर्यंत समजलं नाहीय. असो.

केवळ वर खाली करण्यापलीकडे लिफ्ट अजून इतरही कार्य करत असते. अलीकडच्या टीवीवरील जाहिराती पहिल्या तर कळते की लिफ्ट मध्ये चित्रित जाहिरात फिटनेस ड्रिंक ते दारूच्या नावाच्या music CDs पासून detergent, perfumeपर्यंत काहीही विकण्याची ताकत या लिफ्ट मध्ये असते. कारण कदाचित लिफ्ट हा खरच एक अद्वितीय अनुभव असतो जो अगदी नकळत पणे व्यक्तिगत बनतो. लिफ्ट चे अनेक प्रकार असतात. mall मधली प्रशस्त, airport वरील modern, हॉटेल्स मधली पारदर्शक दरवाज्याची, Factory वैगेरे मधील दणकट नी अगडबंब असे असले तरीही लिफ्ट एक "leveler" आहे. इथे अबालवृद्ध, श्रीमंत गरीब, पिऊन-साहेब सगळ्यांचे उत्थापन सोबतच होत असते. लिफ्ट कोणताही भेदभाव करत नाही. ही बंदिस्त खोली खरच मनाने मोठी आहे. 


नावात काय आहे?

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे थोडक्यात पुल देशपांडे  किंवा वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात वपु काळे. कित्येकदा मला वाटतं मराठीत आपण कसं सहज नावातले आणि वडिलांच्या नावातले आद्याक्षर घेऊन नावं लिहितो. इथे दिल्लीत आल्यापासून वेगळंच कळल की नॉर्थ मध्ये असा conceptच नाहीये. मग सहज वाटलं समजा असता तर काय झालं असतं. हे पहा----

Keshav Leelaadhar Ghaai                 केली घाई
Venkat Deevaakar Dwivedee            वेदी द्विवेदी
Janardan Raghav Chawla                  जरा चावला
MOhan Thakureshwar Daas             मोठा दास
Naresh Koteshwar Dalaal                 नको दलाल
Harish Vaaman Anand                      हवा आनंद
Geralal Laalji Pai                              गेला पाई
Chinmay Treedev Karan                  चित्री करण
Hanumanat Sameer Rey                   हस रे
Choteraam Tekchand Sarkaar          छोटे सरकार
Ram Trigun Surya                            रात्री सूर्य
Govind Daman Prasaad                   गोड प्रसाद
Bheem Trayambk Singh                  भित्रा सिंघ


अजून काही आढळलं तर जरूर सुचवा.



(ह्या Post मधील नावे संपूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक्तेशी काडीमात्र संबंध नाही आणि न जाणो असलाच तर तो योगायोग समजावा ) 

वादळ

मी एक वादळ
संतप्त पाण्याच्या शब्दांना प्रसवणारं
सीमाहीन संकुचित सागराच्या रागाला ऐहिकरूपात बदलणारं

मी वादळ 
सारं सामावून घेणारं
पृष्ठभागावरून स्वत:भोवती 
गिरकी घेत हवेलाही वजन देणारं

मी वादळ सर्व हलवून टाकणारं
मनातल्या समाधानाच्या डोंगरांना पार करणारं
नुकतंच जन्मलेलं पण अगणित 
काळापासून कालचक्राच्या साक्षी असणाऱ्या
सागराला भयंकर रूप देणारं
मी वादळ अहंकारी

मी वादळ पृथ्वीच्या कणांनाही 
स्वत:च्या केंद्राभोवती फिरवणारं
मी वादळ उर्जेच भुकेलं
मिळेल त्याला तुडवून त्यातलं
सारं शोषून घेणारं

स्वत:च्या झंझावातात विध्वंस ओढवणारं
मी वादळ जगाला विसरून
आत्मकेंद्री बनलेलं

मी वादळ मोठाल्या झाडांना
मुळासकट उपटणारं
पण शेवाळ्यासमोर हात टेकलेलं
मी पणाच्या सर्वोच्च आविष्कारापासून
क्षुद्रपणासमोर लोटांगण घालणारं
मी एक वादळ ...
नुकतंच विरलेलं.

its okay to fail

The Hindu (Delhi, dt 20 January, 2016) reported ‘Woman stabbed dozen times by her jilted lover’ on front page. This scary yet usual situation in society is manifestation of something very wrong. The society facing such sad state of younger generation has never given a thought on what could be done to improve the situation. We may most of times choose to avoid paying attention and blame the law keepers. But what we need to do is to identify the problem and eradicate the cause. And believe me, we never do that.

The accused every time represents mind giving more importance to material things. Since childhood to any age we collectively give excessive importance to winning. Be it in academics or simply boarding the bus. Never a conscious look is given to this habit eating the peace of mind. It is never learnt that it is okay to fail. How many grownups remember their marks in Math in 5th standard? But am sure all recall the bashing they had from their parents/teachers for less marks.


Why winning is important? It is just a state of mind that will eventually fade away. Failure too is no different. We, hence, must inculcate tuning our mind to realize failure is okay. I am not at all quoting successful persons of society who are a big success after failure according to my WhatsApp chat. I am on the other hand trying to make a basic point that being peaceful as a state of mind is more important than being a winner or loser. Don’t you agree that with peaceful mind the society shall see less of scary news on front page of newspaper?

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...